कृषिमंत्र्याच्या राज्यात बळीराजा अंधारात वालचंदनगर प्रतिनिधी:=बदलत्या वातावरणाबरोबर इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भार नियमानाचे ओझे शेतकऱ्यांच्या डोक्यावर टाकून महावितरण विभागाचे देखील वातावरण बदलले असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे. वालचंदनगर कळंब चिखली निमसाखर रणगांव निरवांगी आदी भागातील शेतकऱ्यांवर सायंकाळी सहा ते रात्री दहा हे चार तासाचे भार नियमन महावितरण विभागाने लादले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत गावठाण क्षेत्रातील नागरिकांना घरी विजेचा पुरवठा उपलब्ध आहे मात्र शेतकऱ्यांच्या दारात अंधार आहे. दिवसभर काबाडकष्ट करणारा शेतकरी रात्रीच्या वेळी थकून घरी येतो त्यावेळी शेतकऱ्याची मुले अंधारात अभ्यास करू शकत नाहीत. संध्याकाळच्या वेळी शेतामधील जनावरांच्या गोठ्यात काम करू शकत नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढू…
Author: संपादक तात्यासाहेब घाटे
डिजिटल क्रिएटिव्हिटीला नवे व्यासपीठ : graphicswale.com इंदापूर प्रतिनिधी:= बदलत्या काळानुसार आजच्या पिढीने नव्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे त्यांनुसार समाजातील विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक डिझाईन तयार करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर GraphicsWale हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर येथील ग्रामीण भागातील करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी दिली आहे.या वेबसाइटवर आकर्षक अशी लग्नाचे निमंत्रण, श्रद्धांजली पोस्टर, उद्घाटन समारंभ, वाढदिवस, जयंती, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती आदी विविध कार्यक्रमांसाठी रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध करण्यात आली असून वापरकर्ते मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत आकर्षक डिझाईन तयार करून डाउनलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण विष्णू देवकर…
डिजिटल क्रिएटिव्हिटीला नवे व्यासपीठ : graphicswale.com इंदापूर प्रतिनिधी:= बदलत्या काळानुसार आजच्या पिढीने नव्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे त्यांनुसार समाजातील विविध कार्यक्रमांसाठी आकर्षक डिझाईन तयार करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर GraphicsWale हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याची माहिती इंदापूर येथील ग्रामीण भागातील करण देवकर आणि शिवानी देवकर यांनी दिली आहे.या वेबसाइटवर आकर्षक अशी लग्नाचे निमंत्रण, श्रद्धांजली पोस्टर, उद्घाटन समारंभ, वाढदिवस, जयंती, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती आदी विविध कार्यक्रमांसाठी रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध करण्यात आली असून वापरकर्ते मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून काही मिनिटांत आकर्षक डिझाईन तयार करून डाउनलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण विष्णू देवकर…
वालचंदनगर प्रतिनिधी:= फळ विक्रेत्याचा मुलगा झाला सीए: जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. कळंब (रामवाडी) वालचंदनगर येथील फळविक्रेते आयुब जंगबहादुर आळंद यांचा मुलगा अबरार आयुब आळंद याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेला गवसणी घालत यश संपादन केले. अबरारच्या यशाने आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फिटले आहे. अबरारने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवघ्या २३ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली. अबरार आळंद यांचे शिक्षण भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंद नगर येथून तसेच अकरावी बारावी वाणिज्य शाखेतील शिक्षण बीएमसीसी पुणे आणि बीकॉम एमएमसीसी कॉलेज पुणे येथून झाले. अबरारने अभ्यासात विशेष लक्ष केंद्रित करून दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून अवघ्या २३ व्या वर्षी…
” निर्भीड न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले असून या चर्चासत्रामध्ये १६ देश सहभागी होणार असून ८०० हून अधिक विद्यार्थी संवाद साधणार असल्याची माहिती फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब येथील फडतरे नॉलेज सिटी मध्ये ६ आणि ७ फेब्रुवारी या दिवशी फार्मसी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विषयावर चर्चासत्र होणार आहे . या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक विकासात लाखमोलाचे योगदान देत असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील फडतरे नॉलेज सिटी कळंब वालचंदनगर युनिव्हर्सिटी न्यू जर्सी यूएसए आणि आफ्रिका एशिया स्कॉलर्स ग्लोबल…
पुणे प्रतिनिधी भारतामध्ये सर्वाधिक पसंती असलेल्या क्रिकेट खेळातील दोन दिग्गज खेळाडूंवर ईडीने जप्ती आणीत ११कोटी १४ लाखाची मालमत्ता जप्त केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील नावलौकिक मिळवलेल्या व फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कर्तबगार असलेल्या सुरेश रैना व शिखर धवन या दोन खेळाडूंवर मनी लॉन्ड्री प्रकरणी जप्ती आणली असून त्यांनी टाकलेल्या दाढीमध्ये सुरेश रैना यांची ६ कोटी ६४ लाख तर शिखर धवन यांची ४ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी 1x Bet व त्यांच्याशी संबंधित असलेल्या जाहिरात प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यावर भारतात बंदी असताना या कंपन्यांची जाहिरात केल्याप्रकरणी सुरेश रैना व शिखर धवन या दोन क्रिकेटपटूनवर फसवणूक व…
इंदापूर प्रतिनिधी:= इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काझड येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे. वालचंदनगर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे काझड (तालुका इंदापूर )येथील सिंधू काशिनाथ नरोटे वय ६० वर्ष या आपल्या राहत्या घराजवळील आर्या जनरल स्टोअर्समध्ये सामान खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या युवकांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून युनिकॉर्न या दुचाकीवरून पळून गेले. वालचंदनगर पोलिसांनी याबाबत भवानीनगर, काझड, बोरी ,लाकडी, निंबोडी व बारामती तालुक्यातील रुई ,सावळ ,काटेवाडी कन्हेरी आदि गावातील किमान १००हून अधिक सीसी टीव्ही फुटेज तपासणी केली असता फिर्यादी व साक्षीदार आणि गुणवडी येथील…
इंदापूर प्रतिनिधी:= “देशाच्या प्रगतीत खेळाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबत आपल्यातील अंगभूत खेळाला वाव देत योग्य मार्गदर्शन व यशस्वी होण्यासाठी सराव केल्यास खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकिक वाढेल “असे मत बीसीए चे प्राचार्य कृष्णदेव शिरसागर यांनी व्यक्त केले. भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर मधील विद्यार्थी इंद्रजीत रणवरे याने अलिबाग येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. या यशामध्ये मार्गदर्शक कोच व प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीतने शिस्तबद्ध सराव करून राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले. इंद्रजीत रणवरे यांच्या यशाबद्दल …
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कळंब गावातील गार्डन चौक ते लालपुरी या १२०० मीटर अंतराच्या रस्त्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार निधीतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र तयार झालेला रस्ता तीन महिन्यातच उघडल्याने व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्घाटन करण्यापूर्वीच शासनाचा निधी पाण्यात गेला की काय अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. कळंब येथील शेतकरी सोमनाथ पवार यांच्या घरालगत गार्डन चौक ते लालपुरी हा १२०० मीटरचा रस्ता आहे त्यामध्ये ४०० मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले व ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले खरे. मात्र या डांबरीकरण केलेल्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे. खड्डे…

